Ad will apear here
Next
आठवणींच्या सरींनी भिजवणारा मल्हार
मल्हार राग मोठा विलक्षण! गायला सुरुवात केली, की सुखद सरींची बरसात सुरू! तसाच काहीसा आपल्या प्रत्येकाच्या मनाच्या तळाशी एक मल्हार दडलेला असतो. त्याची नुसती याद जागवली, तरी आठवणींच्या सरींनी तो चिंब करतो आपल्या मनाला... शरीराला... आणि मग ती धुंदी... ती तंद्री न संपू नये अशी! चंद्रशेखर टिळक यांचं ‘मल्हार मनाचा’ हे नवीन पुस्तक अशाच काही सुंदर आठवणींचे तुषार शिंपडत मनाला तजेला देणारं... त्या पुस्तकाचा हा परिचय...
..............
काही काही पुस्तकं वाचायला सुरुवात केली, की त्यातली भाषा आणि संवाद आपल्याशी दोस्ती करून जातात. चंद्रशेखर टिळकांना ती हातोटी अवगत आहे. त्यांच्या या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य म्हणजे एखाद-दुसरा लेख सोडला तर त्यांचं बहुतेक लेखन म्हणजे छोट्या छोट्या संवादांनी बनलेली गोष्ट आहे आणि म्हणून ते चटकन आपलंसं करतं.

‘मल्हार मनाचा’मधून त्यांनी जगलेले, अनुभवलेले ते आठवणींचे कवडसे आपल्यासमोर मांडलेत आणि तेही इतक्या हलक्याफुलक्या प्रवाही संवादांतून, की आपणही नकळत तन्मय होऊन ते क्षण समोर घडल्यागत जगतो.

छोट्या छोट्या घटना, त्यांतून उलगडणारी नवरा-बायको, मित्र-मैत्रीण, सखा-सखी, बाप-लेक अशी नाती, आपल्या नकळत आपल्याही आयुष्यात आपण जगलेले तशा प्रकारचे क्षण आपल्या डोळ्यांसमोर उभे करतात आणि आपण त्या सहजसुंदर, पण प्रत्ययकारी भाषेबद्दल मनोमन टिळकांना सलाम करतो.

ज्यांना टिळकांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग अजून आला नसेल, अशा वाचकांना टिळकांचं कर्तृत्ववान, हुशार आणि त्याच वेळी तरल, भावनाप्रधान असं रूप या १२८ पानांमधून निश्चितच डोळ्यांसमोर उभं राहतं. टिळकांच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे सहज डोकावून जाणारी चमकदार वाक्यं!

‘प्रेमळ स्पर्श हे पराक्रमाचे-प्रतिभेचे कारण असतात आणि परिणामही.’
‘महागाई महत्त्वाकांक्षाही लिलावात उतरवते.’
‘रसिकाला सौंदर्य असण्यात स्वारस्य असते; रंगेलाला त्याच्या उपभोगात.’
‘वस्तुस्थिती आणि सद्यस्थिती याच काय त्या सापेक्ष असतात. बाकी मनःस्थिती, परिस्थिती सगळे सापेक्ष असते.’
‘घटस्फोट नात्याला असतो, आठवणींना नाही. आणि भावबंधालाही नाही.’

या छोटेखानी लेखनातून त्यांनी उभा केलेला पुरुष आणि त्याची सर्वच नाती ही एका सुदृढ समाजासाठी निश्चितच आवश्यक आहेत, अशी भावना हे पुस्तक खाली ठेवताना मनात नक्कीच तरळून जाते. हे पुस्तक अवश्य वाचावं असं आहे!

पुस्तक : मल्हार मनाचा
लेखक : चंद्रशेखर टिळक
प्रकाशक : दिलीप महाजन/गौरी देव, मोरया प्रकाशन, डोंबिवली पूर्व - ४२१ २०३
संपर्क : ९८२०२ ९२३७६
पृष्ठे : १२८
मूल्य : १७५ ₹

(‘मल्हार मनाचा’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZJIBM
Similar Posts
गुलजारांच्या साहित्याचा रसास्वाद ‘प्रेमा तुझा रंग कसा, हा प्रश्नच कधीही पडला नाही, आपण एकमेकांच्या प्रेमात आहोत, हाच रंग अजून उतरला नाही’ अशी काव्यमय दाद आपल्या आवडत्या गुलजारांच्या साहित्याला देणारे चंद्रशेखर टिळक यांचं गुलजारजींविषयीचं प्रेम आणि भक्ती त्यांच्या ‘मला भावलेले गुलजार’ या पुस्तकाच्या पानापानांतून दिसत राहते. त्या पुस्तकाचा हा परिचय
तरल लेखणीचा आविष्कार ‘भाषेला व्याकरण असते, भावनेला नाही. त्यामुळे ज्ञानग्रहणात शिस्त हवी आणि त्याच्या अभिव्यक्तीमध्ये नजाकत’ हे किंवा ‘जाताना पोचण्याची ओढ असते; येताना आठवणी रेंगाळत असतात’ अशी सुभाषितवजा वाक्यं ज्यांच्या हळुवार मनातून सहजच जन्म घेतात, अशा पेशाने अर्थतज्ज्ञ असणाऱ्या, पण वृत्तीने संवेदनशील लेखक असणाऱ्या चंद्रशेखर
विश्वगामिनी सरिता! कधी ‘कॅसाब्लांका’मुळे गाजलेल्या मोरोक्को आणि सहारासकट नामिबिया-साउथ आफ्रिकेला भेट, तर कधी बाल्कनसकट संपूर्ण युरोप, कधी हक्काची संपूर्ण अमेरिका आणि कधी गोबीवाला मंगोलिया, तर कधी गलापगस बेटांवर, कधी न्यूझीलंडमुक्कामी आणि कधी तर थेट रक्त गोठवणाऱ्या बर्फाळ थंडीच्या अंटार्क्टिकावर... अशी पृथ्वीच्या पाठीवरची
खिळवून ठेवणारी त्रि-सिनेधारा ‘मस्ट सी’ कॅटेगरीत आज दुसरी फिल्म, नव्हे खरं तर तीन फिल्म्स एकत्र! कारण एकाच कथेत या तीन फिल्म्स गुंतल्या आहेत. खरं पाहता तिन्ही फिल्म्स एकमेकांशिवाय अपूर्ण; कारण कथा आणि कथेतल्या पात्रांना वेगवेगळ्या काळांत जाऊन भेटल्याशिवाय आणि काही गोष्टी ‘घडवून आणल्याशिवाय’ कथा अपूर्ण! गोंधळलात ऐकताना? मग त्यासाठी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language